Pages

Friday, July 13, 2012

आठवणीतले सामने- भारत वि इंग्लंड १९७९, चौथी कसोटी, ओव्हल.

आठवणीतले सामने.. (सुनील गावसकर वाढदिवसानिमित्त)

भारत वि इंग्लंड १९७९, चौथी कसोटी, ओव्हल.

चौथ्या डावात हाराकिरी करण्याची जी भारताची ख्याती होती/आहे त्याला छेद देणारा हा सामना होता. जर आपण जिंकलो असतो तर कसोटी इतिहासातील सर्वोत्त्म काही सामन्यांमध्ये गणला गेला असता.

प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ३०५ धावा केल्या (गूच ७९, विली ५२). भारताचा पहिला डाव २०५ धावात आटोपला. (विश्वनाथ ६२, यजुवेंद्र ४३).

इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ३३४ वर घोषित केला (बॉयकॉट १२५, बेअरस्टो ५९) आणि भारतापुढे विजयासाठी ४३८ धावांचे आव्हान ठेवले. खरं आव्हान १५० षटके खेळून काढणे हेच होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या बिनबाद ७६ धावा झाल्या होत्या. जिंकायचे असेल तर पाचव्या दिवशी मिनिटाला एक अशी धावगती हवी होती. डाव सुरु झाल्यापासून ३१४ मिनिटानंतर भारताचा पहिला गडी (चेतन चौहान, ८०) बाद झाला तेव्हा एकूण धावसंख्या २१३ होती. वेंगसरकरच्या साथीत गावसकरने धावगती वाढवायला सुरुवात केली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या १ बाद ३०४ धावा झाल्या होत्या. इंग्लंडने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आणि षटकांची गती मंदावली. २० अनिवार्य षटके चालू झाली तेव्हा भारताला ११० धावा हव्या होत्या. १५३ धावांच्या भागीदारीनंतर ३६६ वर वेंगसरकर बाद झाला. कपिलला चौथ्या क्रमांकावर बढती दिली गेली आणि भोपळा न फोडता ५ चेंडूत कपिल बाद झाला. यशपाल शर्माच्या बरोबर २२ धावांची भर घातल्यावर, ८ तास आणि ९ मिनिटे खेळून गावसकर बाद झाला तेव्हा त्याच्या स्वत:च्या २२१ धाव्या झाल्या होत्या आणि संघाच्या ३८९.

४१० वर विश्वनाथ तंबूत परतला, ४११ वर यजुवेंद्र, ४१९ वर वेंकट आणि ४२३ वर यशपाल. शेवटचे षटक चालू झाले तेव्हा भारताला १५ धावा होत्या आणि इंग्लंडला दोन बळी.

भारत रेड्डी आणि घावरी ६ धावा करु शकले आणि भारत ८ बाद ४२९ वर थांबला.

(गावसकर २२१, चौहान ८०, वेंगसरकर ५२, अवांतर २७)




रेडिओवर शेवटच्या दिवसाच्या खेळाचं धावतं समालोचन ऐकल्याचं मला आठवतं आहे आणि तो थरारही आठवतो आहे. लेखातील सविस्तर माहिती क्रिक-इन्फोच्या सौजन्याने